ठाणे : केंद्र सरकारच्या यशस्वी विकासात्मक वाटचालीस ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाणे शहर भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ता संमेलन आयोजित केले होते. विशेष म्हणजे या संमेलनासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
एक उत्तम नेतृत्व, उत्तम वक्ता, संघटनशीलता अशा अनेक गुणांनी परिपूर्ण स्मृती इराणी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ‘कार्यकर्ता असो वा लोकप्रतिनिधी, प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली तर समाजात परिवर्तन आपोआप दिसून येते,’ असे म्हणत त्यांनी सर्वांशी संवाद साधला. या वेळी प्रभाग क्र. ४ च्या नगरसेविका स्नेहा आंब्रे उपस्थित होत्या.